१५ फेब्रुवारीनंतर ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन यादी जाहीर

Ration card ekyc अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास थान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे.

 

या रेशन कार्ड धारकांचे रेशन होणार बंद !

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते. त्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई केवायसीसाठी गावोगावी शिबिर आयोजित केले आहे. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी शिबिरात अथवा आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवासी करावयाची आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत असून त्यानंतर थान्य दिले जाणार नाही. तशा सूचना दुकानदारांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानदारांनी दरमहा ७ तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप करावयाचे आहे.

 

या रेशन कार्ड धारकांचे रेशन होणार बंद !

यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

कोणत्याही परिस्थितीत दरमहा १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावयाचे असल्याच्या सक्त सूचना त्यांना दिल्या आहेत. अद्याप रेशनकार्ड नसलेल्या केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेंतर्गत तातडीने शिधापत्रिका देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमधून तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे ज्यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही शिधापत्रिका मिळाली नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातून शिधापत्रिका मिळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले आहे.

Leave a Comment